जेव्हा कधी मी एकांतात बसतो
न जाणे कुठून विचार मनी येतो
काहीतरी लिहावे असे मनातून वाटते
जेव्हा मग हा विचार द्रुढ होतो
न जाणे कुठून एक कल्पना सुचते
ती शब्दात उतरवावी असे मनातून वाटते
मग जेव्हा मी लिहायला बसतो
न जाणे कुठून सुंदर ओळ स्फुरते
ती कवितेत असावी असे मनातून वाटते
अशाच ओळींमागून ओळी लिहीत राहतो
न जाणे कुठून कविता जन्म घेते
ती सर्वांना आवडावी असे मनातून वाटते
Monday, September 15, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment